अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे चाहत्यांचं लक्ष हे दोघं लग्न कधी करतात याकडे लागून राहिलं आहे. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. पण आता आलियानं या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं यावर भाष्य केलं.

आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाला, ‘तुझ्या कामापेक्षा जास्त चर्चा तू लग्न कधी करणार याची होताना दिसते त्यामुळे तुला फरक पडतो का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आलिया म्हणाली, ‘मला माहीत नाही. कदाचित मला आठवतही नाही की मला यामुळे काही फरक पडतो किंवा नाही.’

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद

आलिया पुढे म्हणाली, ‘मागच्या काही दिवसांमध्ये बऱ्याच कपल्सनी लग्न केलंय त्यामुळे मला वाटतं की, आम्ही कपल आहोत तर आम्ही पण आता लग्न करावं असा विचार लोक करतात. पण माझ्यासाठी या सर्व गोष्टी माझ्या भावनांवर अवलंबून आहेत की, मला नक्की काय करायचं आहे आणि जे काही करायचं असेल ते योग्य वेळीच करायला हवं. मी तेव्हाच लग्न करेन जेव्हा मी या सर्व गोष्टींसाठी तयार असेन किंवा कम्फर्टेबल असेन. हीच गोष्ट रणबीरसाठीही लागू होते.’

या मुलाखतीत आलिया म्हणाली, ‘हे पाहा आम्हा दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आणि मला वाटतं माझ्या आयुष्यात आतापर्यंत आलेल्या सर्व व्यक्तींमध्ये तो सर्वात चांगला व्यक्ती आहे. ज्या प्रकारे मी त्याचा आदर करते, माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आहे. ज्याप्रकारे तो मला नेहमीच पाठिंबा देतो. अशा बऱ्याच गोष्टी प्रेमाखातर आहेत आणि मला वाटतं की तो देखील माझ्याबद्दल चांगलंच बोलेल. सर्व गोष्टी योग्य वेळी होती. खरं तर मी कधी लग्न करणार हे आता सांगणं खूप घाईचं होईल. पण जेव्हा आम्ही लग्न करू तेव्हा सर्वांनाच समजणार आहे.’