उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यामधील वाद सध्या बराच चर्चेत आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीबाबत काही वक्तव्य केली आहेत. तर उर्फीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकाराबाबत उत्तर देत आहे.

आणखी वाचा – अंगभर कपडे परिधान केल्यामुळे उर्फी जावेदच्या त्वचेवर अ‍ॅलर्जी, अभिनेत्रीचं कारण ऐकून चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “गोळ्या देऊन…”

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद

उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यामधील वादादरम्यान काही राजकीय मंडळींनी यावर आपलं मत व्यक्त केलं. सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे या राजकीय मंडळींनी उर्फी व चित्रा वाघ यांच्या वादाबाबत प्रतिक्रिया दिली. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘मूड बना लिया’ हे अमृता फडणवीस यांचं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या लाँचिंगदरम्यान त्यांना उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्या वादावर तुमचं मत काय? अस विचारण्यात आलं. मात्र यावर त्यांनी बोलणं टाळलं.

आणखी वाचा – जावेद अख्तर यांना भेटल्यावर उर्फीने त्यांच्याकडे मागितली ‘ही’ गोष्ट, संभाषण शेअर करत म्हणाली…

अमृता म्हणाल्या, “सध्यातरी मला ‘मूड बना लिया’ या गाण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. पण नंतर या विषयावर मी नक्की बोलेन. आता यावर मी बोलू शकत नाही. कारण मला विषय भरकटवायचा नाही. सगळ्यांनी तुम्ही या गाण्यावर नाचा, उर्फीलाही या गाण्यावर नाचवा.” ‘मूड बना लिया’ या अमृता फडणवीस यांच्या गाण्याला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे.