‘अश्रूंची झाली फुले’ : रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाटककार प्रा. वसंत कानेटकरांचं ‘अश्रूंची झाली फुले’ हे मेलोड्रामा शैलीतलं गाजलेलं नाटक. ते रंगभूमीवर आल्याला आता अर्धशतकाहून अधिक काळ लोटलाय. त्यावर बेतलेला ‘आसू बन गए फूल’ हा हिंदी सिनेमाही त्याकाळी लोकप्रिय ठरला होता. परंतु तेव्हाचा काळ आणि आजचा काळ यांत जमीन-अस्मानाचं अंतर पडलंय. त्याकाळचं काहीएक आदर्श मानवी मूल्यं जपणारं सामाजिक वातावरण आणि आज सर्वदूर फोफावलेला अतिरेकी व्यक्तिवाद यांत काहीच ताळमेळ उरलेला नाहीए. या पाश्र्वभूमीवर कानेटकरांचं ‘अश्रू..’ पुनश्च रंगमंचावर अवतरलं आहे. त्यामुळेच त्याकडे एका वेगळ्या नजरेनं पाहणं क्रमप्राप्त ठरतं. केवळ गतरम्यता म्हणून या नाटकाकडे पाहिलं तर काही प्रश्न नाही. परंतु गत आणि वर्तमान काळाची तुलना करू जाता या नाटकात खटकणारे अनेक मुद्दे जाणवतात. विशेषत: यातली काळ्या-पांढऱ्या रंगांत रंगवलेली पात्रं त्यावेळी सहज स्वीकारली गेली असली तरी आज माणसांचं जगणं एवढं गुंतागुंतीचं आणि व्यामिश्र झालं आहे, की या नाटकातील वास्तवाकडे कसं पाहावं असा प्रश्न पडतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashroonchi zhali phule vasant kanetkar marathi natak akp
First published on: 01-09-2019 at 01:59 IST