होळीची पार्श्वभूमी आपण सर्वजण जाणतोच. होलिकादहनामधे सर्व वाईट गोष्टी व विचार नष्ट करुन होळीची पुजा होते. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे ‘रंगपंचमी’. ‘रंगपंचमी’ हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, या दिवशी प्रत्येकजण रंगांमध्ये अक्षरशः न्हाहून निघतो.
कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेमध्ये होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही सण साजरे होणार आहेत. भोसले परिवार, वाड्यामध्ये नुकतीच आलेली शांभवी हे सगळे मिळून होलिका दहन आणि रंगपंचमी हा सण साजरा करणार आहेत. या होलिका दहनाच्या निमित्ताने वाड्यामधील वाईट गोष्टींचा नाश होईल? शांभवी वाड्यामधील रहस्य जाणू शकेल? निर्मलाच्या हेतुंचे दहन होईल? हे बघणे रंजक असणार आहे. या शुभ दिनाच्या दिवशी काही अघटीत तर घडणार नाही ना? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतील.
‘चाहूल’ मालिकेमध्ये भोसले कुटुंबांनी होळीची जय्यत तयारी केली आहे. वाड्याच्या बाहेर होळी सजवली असून घरच्या सगळ्यांनी तिची पूजा केली, आणि सर्जाने होळीला अग्नी दिला. पण याचवेळी शांभवीच्या पदराला आग लागली. आता हे कस झालं? कोणी केलं? निर्मालानेच तर नाही ना केलं? हे तुम्हाला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी सर्जा, शांभवी आणि भोसले परिवार रंग खेळत असताना निर्मलालादेखील तिची आणि सर्जाची रंगपंचमी आठवते. तिने आणि सर्जाने रंगपंचमी कशी खेळली होती, किती रंग उधळला होता हे सगळंच निर्मलाला आठवतं.
भोसले वाड्यामध्ये सगळे रंगपंचमी खेळले आहेत. कुठेही पाण्याचा अपव्यय न करता फक्त विविध रंगांनी देखील रंगपंचमीचा आनंद तितकाच लुटता येतो असा, संदेश ‘चाहूल’ मालिकेचे कलाकर देत आहेत. रंग पंचमीच्या दिवशी सर्जा आणि शांभवीला रंग खेळताना बघून निर्मलाला वाईट वाटत असते आणि खूप राग येतो. निर्मलाला हे सहन होत नाही आणि ती सर्जा आणि शांभवीला कधीच एकत्र येऊ न देण्याचा निश्चय कते.
या सगळ्या घटनांमध्ये सर्जा आणि शांभवीमध्ये मैत्रीची ‘चाहूल’ लागते पण आता ही मैत्री प्रेमात बदलू शकेल? निर्मला ते होऊ देईल? हे जाणून घेण्यासाठी बघा चाहूल महासप्ताह १३ ते १८ मार्च रात्री १०.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर.