‘बॉर्डर’ (१९९७) पूर्वी दिग्दर्शक जे. पी. दत्ताची ओळख राजस्थान-उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवरील थीमपासून संगीतापर्यंत चित्रपट निर्माण करण्याची होती. भाषेतूनही ती खासियत जपली जाई. आग्रा, फतेहपुर येथील मुगलकालिन किल्ले, ग्रामीण परिसर, तेथील ‘क्षत्रिय’ संस्कृती, ‘ठाकूर’ अभिमान/ कडवटपणा व राजस्थानचा वाळवंटी भाग यातून त्याला व त्याचे पटकथाकार लेखक पिता ओ. पी. दत्ता याना नवीन चित्रपट सुचतो वा सापडतो असे म्हटले जाई. तुफान घौडदौड, बेछूट गोळीबार, खणखणीत तलवारबाजी, जोरदार संवाद, अवघड गीते या सामुग्रीसह ‘मल्टी स्टार कास्ट’ या दमदार वैशिष्ट्याने त्याचे चित्रपट मनोरंजक ठरत. ईश्वर बिर्दीचा कॅमेरा, रत्नाकर फडकेचे कला दिग्दर्शन व दीपक विरकुडचे संकलन ही त्याची हुकमी टीम.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गुलामी’ (१९८५) च्या यशाने त्याला हे सूत्र दिले. तर ‘यतीम’ (१९८८), ‘हत्यार’ (१९८९) व ‘बंटवारा’ (१९८९) हे साधारण एकाच वेळेस आले. तेव्हा विभागवार चित्रपट प्रदर्शित होत. त्यामुळेच उत्तर भारतातून मुंबईत ‘यतिम’ येईपर्यंत १९८९ साल उजाडले व एकाच वर्षी एकाच दिग्दर्शकाचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘क्षत्रिय’ (१९९३) ला आला. एव्हाना जे.पी. दत्ताच्या भव्य चित्रपटाची आपली वेगळीच संस्कृती होती हे चांगलेच लक्षात आले असेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindi cinema batwara and j p dutta
First published on: 23-02-2018 at 01:05 IST