बॉलिवूड हिट चित्रपटांच्या यादीत आवर्जुन नाव घेतलं जाणारा चित्रपट म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम.’ अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांची उत्तम केमिस्ट्री दाखविण्यात आलेला हा चित्रपट आजही अनेकांच्या आवडीचा चित्रपट असल्याचे पाहायला मिळते. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाने त्याकाळी तुफान लोकप्रियता मिळविली होती. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटासाठी ऐश्वर्याने कशी मेहनत केली होती हे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सेटवरील काही सीन दाखवण्यात आले होते. तसेच संजय लीला भन्साळी हे ऐश्वर्याच्या कामाविषयी सांगत होते. ऐश्वर्याने या भूमिकेला न्याय देण्यासाठी सारे काही केले जे गरजेचे होते, असे त्यांनी सांगितले होते. आणखी वाचा : ‘कोणी तरी मला स्पर्श करत असल्याचा भास झाला’, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव View this post on Instagram A post shared by Bhansali Productions (@bhansaliproductions) “जस जसं चित्रपटाचं चित्रीकरण पुढे सरकत होतं, तसतशी मला जाणीव व्हायला लागली होती की,या भूमिकेला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी ऐश्वर्या व्यवस्थित पार पाडत होती. ती सगळं काही करत होती जे मला चित्रपटासाठी आवश्यक होतं. मला चित्रपटात काम करताना प्रामाणिकपणा हवा. जर तुम्ही चित्रपटाशी आणि स्क्रिप्टप्रती प्रामाणिकता दाखवत असाल तरच तुमचं काम योग्य आणि उत्तम होईल. पण जर तू ऐश्वर्या राय किंवा मिस वर्ल्ड असल्याचं डोक्यात ठेवून काम केलं तर कदाचित तू योग्यरित्या काम करु शकणार नाही, असं मी ऐश्वर्याला सांगितलं होतं आणि तिनेदेखील प्रमाणिकपणे या चित्रपटात काम केलं”, असे संजय लीला भन्साळी यांनी सांगितले होते. ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला होता. ऐश्वर्या आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांना अक्षरश: उचलून धरलं होतं. त्यामुळे आजही हा चित्रपट अनेक जण तितक्याच आवडीने पाहतात. ऐश्वर्या आणि सलमान व्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण,विक्रम गोखले,झोरा सेहगल, हेलन, स्मिता जयकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट १९९९ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.