‘काय पो छे’ अभिनेता राजकुमार राव याने ‘एनएच १०’ या चित्रपटाला बाय बाय केले आहे. या चित्रपटातील अभिनेत्री आणि सह निर्माता अनुष्का शर्मामुळे राजकुमारने चित्रपट सोडल्याची चर्चा आहे. मात्र, चित्रपट सोडण्याचा निर्णय स्वतःचा असून, अनुष्काबद्दल कोणतीच तक्रार नसल्याचे त्याने म्हटले आहे. अनुष्का फॅन्टम फिल्म्ससोबत संयुक्तपणे अॅक्शपट ‘एनएच १०’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
राजकुमार म्हणाला की, मी यापूर्वीच काही चित्रपटांना माझ्या तारखा दिल्या आहेत. त्यामुळे मला ‘एनएच १०’ सोडावा लागला. मी अधिकृत्यरित्या या चित्रपटाकरिता कोणतेच पेपर सही केले नव्हते. मी यात काम करणार होतो, पण चित्रपटाचे काम सुरु होण्यास उशीर झाला. त्यानंतर मी ‘काय पो छे’ आणि ‘शाहिद’ यांच्या चित्रीकरणात व्यस्त झालो आणि पुन्हा एका नव्या कामात गुंतलो. मी एकाच वेळी दोन चित्रपटात काम नाही करु शकत. एका वेळी एकच चित्रपट करणे मला योग्य वाटते आणि आवडते. अनुष्का ही एक समजूतदार आणि चांगली अभिनेत्री आहे, असेही तो म्हणाला.
यापूर्वी अनुष्काने राजकुमारला चित्रपटातून काढून अभिनेता नील भूपालमला घेतल्याची चर्चा होती. भूपालम आता अनिल कपूरच्या ‘२४’ या मालिका काम करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I have no issues with nh 10 producer anushka sharma raj kumar
First published on: 25-11-2013 at 02:01 IST