बिग बॉस १५ मध्ये जेव्हा राखी सावंतनं वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला होता. कारण यावेळी तिनं सर्वांशी तिच्या पतीची ओळख करून दिली. अनेक दिवस राखीच्या लग्नाची चर्चा झाल्यानंतर अखेर बिग बॉसच्या १५ व्या पर्वामध्ये राखी सावंतचा पती रितेश पहिल्यांदा सर्वांसमोर आला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रितेशनं पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतलं. ज्यावरू त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र यावेळी बिग बॉस १५ चा सदस्य करण कुंद्रानं रितेशची बाजू घेत ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं.

रितेशनं इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतल्यानंतर एका युजरनं त्याच्या इन्स्टाग्राम सेशनचा स्क्रिनशॉट शेअर करत रितेशला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या युजरनं लिहिलं, ‘इतिहास रचला. बिग बॉस सदस्य रितेशचे इन्स्टाग्राम लाइव्हवर १११ युजर्स. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.’ ट्विटरवरील ही पोस्ट पाहिल्यानंतर राखीचा मित्र आणि बिग बॉस १५ चा सदस्य करण कुंद्रान या युजरला चांगलंच सुनावलं आहे.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

करणनं या युजरच्या ट्वीटला रिप्लाय करताना लिहिलं, ‘मला माहीत आहे तुम्ही हे असं त्यांची खिल्ली उडवण्यासाठी असं लिहिलं आहे. पण असं करणं चुकीचं आहे. मी त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केला आहे. ते सुद्धा आपल्या सारखेच आहेत. त्यांना देखील भावना आहेत. एकदा त्यांच्या जागी स्वतःला ठेवून पाहा  आणि मग सांगा तुम्हाला कसं वाटतं.’

दरम्यान बिग बॉसच्या घरात असताना करण कुंद्रा कुणाच्याही बाजूने बोलत नाही म्हणून त्याला नेहमीच बोललं जायचं. यावरून स्वतः सलमान खाननंही त्याला एकदा ‘विकेंड का वार’मध्ये बरंच सुनावलं होतं. एवढंच नाही तर ‘जनता का सवाल’च्या वेळी त्याला तेजस्वी प्रकाशची बाजू न घेतल्यानं बरेच प्रश्न विचारण्यात आले होते.