नाटक, चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरात लोकप्रिय ठरलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमांमुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर आहे. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. संकर्षण कऱ्हाडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्याने लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थानाची झलक दाखवली आहे. त्याबरोबरच त्याने रत्नागिरीतील मिसळ आंबोळीची चवही चाखली आहे.आणखी वाचा : “पिवळ्या रंगाची नऊवारी…”, पूजा सावंतने पहिल्यांदाच सांगितले लग्नाचे प्लॅन्स, म्हणाली, “मला मुंबईत…” “रत्नागिरी” शहरांत आल्या आल्या दिवसाची सुरवात अशी झाली. लोकमान्यं टिळक जन्मस्थान आज मी पहिल्यांदाच पाहिलं..कित्ती छान वाटलं… मग शहरातली फेमस “मिसळ आंबोळी” खाल्ली.. वाह… मज्जा आली …., असे संकर्षण कऱ्हाडेने म्हटले आहे. त्याबरोबरच संकर्षणने इन्स्टाग्रामवर रत्नागिरीतील भाट्ये बीचचा फोटोही शेअर केला आहे. "भाटे बीच , रत्नागिरी, शुभ संध्याकाळ", असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. आणखी वाचा : ‘डिस्को डान्सर’ने १०० कोटी कमावल्याचं समजताच अशी होती मिथुन चक्रवर्ती यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “एवढे पैसे…” दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे हा सध्या कोकण दौऱ्यावर आहे. 'नियम व अटी लागू' या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त तो या ठिकाणी गेला आहे. या नाटकामध्ये संकर्षणसह अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.