ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडला. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. या संपूर्ण घटनाक्रमानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नेमका आक्षेप काय आहे याबद्दल भाष्य केलं.

नक्की वाचा >> सुप्रिया सुळे शिवीगाळ प्रकरण: “तो नेमका कोणत्या धर्माचं…”; इस्लामचा उल्लेख करत आव्हाड अब्दुल सत्तारांवर संतापले

Amol Kolhe, Shivaji Adhalrao Patil,
शिवाजी आढळराव हे रडीचा डाव खेळत आहेत; अमोल कोल्हेंचा टोला, थ्री इडियट चित्रपटातील सांगितला ‘तो’ प्रसंग
madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास

‘हर हर महादेव’ आणि अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका साकारत असलेल्या ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटांना आव्हाड यांनी विरोध केला. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषद घेत इतिहिसाची मोडतोड करुन दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांना विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे मोठे विधान केले होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीमहाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केला, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. या विरोधानंतर सोमवारी आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसहीत थेट चित्रपटगृहातील चित्रपटाचा शो बंद पाडला.

नक्की वाचा >> ‘हर हर महादेव’ वादावर गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना…”

आपली भूमिका स्पष्ट करताना आव्हाड यांनी, “ज्या पद्धतीने हे दोन चित्रपट येत आहेत आणि ज्या पद्दतीने त्याचं चित्रिकरण करण्यात आलं आहे त्याला आमचा विरोध आहे,” असं आव्हाड म्हणाले. तसेच, “या चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं आहे ते सगळं इतिहासाचं विद्रुपीकरण आहे. मावळा कसा असला पाहिजे. जेधे शतावलीमध्ये जे लिहिलं आहे त्याच्याबरोबर विरोधात चित्रपटामध्ये आलं आहे. मावळा असा गोरापान, दिसायला चिकणा असा मावळा कधी होता?” असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.

नक्की वाचा >> “सुप्रिया तुला अधिक…” सत्तारांचा शिवीगाळ करतानाचा Video शेअर करत सदानंद सुळेंची पोस्ट; म्हणाले, “हे नव्या पुढारलेल्या सरकारचे…”

“शिवाजीमहाराजांच्या मांडीवरती झोपून आहे अफजलखान आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय,” असं आव्हाड म्हणाले. त्याचप्रमाणे ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजीमहाराजांच्या लढाईचं दृश्य दाखवण्यात आलं असून त्यालाही आव्हाड यांनी विरोध केला आहे. “बाजीप्रभू छत्रपती शिवाजीमहाराजांशी लढायला गेले आहेत. हे कुठे दिसलं? बाजीप्रभूंनी शिवाजीमहाराजांशी लढाई केली. बाजीप्रभू सच्चा सेवक होता शिवाजीमहाराजांचा,” असं आव्हाड ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विवीयाना मॉलमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.