scorecardresearch

Premium

‘येणार म्हटलं तर यायलाच पाहिजे ना’, मुंबईच्या लोकलमध्येही अण्णा नाईकांचा आवाज

मालिकेचा प्रोमो सध्या चर्चेत आहे.

‘येणार म्हटलं तर यायलाच पाहिजे ना’, मुंबईच्या लोकलमध्येही अण्णा नाईकांचा आवाज

झी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘रात्रीस खेळ चाले २’ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. आता लवकरच ‘रात्रीस खेळ चाले ३’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच झी वाहिनीनने या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आण्णा नाईक थेट मुंबई लोकलमध्येही पोहोचले असल्याचे पाहायला मिळते.

झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रात्रीस खेळ चाले 3’चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मुंबई लोकलमधून रात्रीचा प्रवास करताना काही लोकं दाखवण्यात आली आहेत. ट्रेनच्या डब्यात बसलेल्या एका व्यक्तीचे लक्ष ‘अण्णा नाईक परत येणार.. अण्णा नाईक परत येणार’ असे लिहिलेल्या ठिकाणी जाते. त्यानंतर तेथे बसलेले सगळे जण अण्णांची खिल्ली उडवतात. तितक्यात अचानक खिडकीजवळ अण्णा येतात आणि ‘येणार म्हटलं तर यायलाच पाहिजे ना’ असे बोलताना दिसतात. त्यानंतर ते वाऱ्याच्या वेगाने गायब देखील होतात.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

‘रात्रीस खेळ चाले ३’चा प्रोमो पाहता चाहत्यांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. मालिका २२ मार्चपासून रात्री ११ वाजता झी मराठी या वाहिनीवर पाहता येणार आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, अण्णा नाईक या भूमिकेने तर सगळ्यांच्या मनात एक भीती निर्माण केली होती. आता या दोन्ही भागांतील पात्र ‘रात्रीस खेळ चाले ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये २० वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता ‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ratris khel chale 3 serial promo avb 95

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×