छोट्या पडद्यावर प्रचंड गाजत असलेली मालिका म्हणजे ‘स्वराज्यजननी जिजामाता’. या मालिकेमध्ये आतापर्यंत अनेक नवनवीन गोष्टींचा उलगडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच जिजामातांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण टप्पेदेखील या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले गेले. त्यातच आता या मालिकेत लवकरच डॉ. अमोल कोल्हे यांची एण्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे या नव्या भागात ते एका खास भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे याच दरम्यान डॉ. अमोल कोल्हे या मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेत ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
bombay hc declare sawantwadi dodamarg corridor as ecologically sensitive
अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

 

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हेंची भूमिका असलेला हा भाग २ आणि ३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे नेमकी कोणती भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांची लक्ष वेधलं असून त्यांची उत्सुकता वाढल्याचं दिसून येत आहे.