शिवकालीन इतिहासाची पाने चाळली तर अनेक शूरवीराच्या कथा आपल्याला उलगडतील. बाजीप्रभू देशपांडे, तान्हाजी मालुसरे, शिवा काशिद, बाजी पासलकर अशा अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वराज्याचं रक्षण केलं. त्यामुळेच या शूरवीरांपैकी एक असलेले तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातून उलगडण्यात आली. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका विशेष गाजली. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे धैर्य घोलप. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या धैर्य आता लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे.

‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकले आहे. या दोन्ही कलाकारांच्या भूमिकांसोबतच धैर्य घोलपची भूमिकाही विशेष गाजली. तान्हाजी मालुसरे यांच्या सैन्यातील एका मावळ्याची भूमिका धैर्यने साकारली होती. यात उदय भान सिंहच्या (सैफ अली खान) हातून त्याचा मृत्यू झाल्याचं दाखण्यात आलं आहे. या चित्रपटानंतर धैर्य लवकरच ‘बावरा दिल’ या मालिकेत झळकणार आहे.

yeh hai mohabbatein fame krishna mukherjee shocking revelations about the Shubh Shagun producer of her show and reveals of being harassed
“निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
no affair clause for Yeh Rishta Kya Kehlata Hai
सह-कलाकारांशी अफेअर करता येणार नाही, ‘या’ मालिकेच्या निर्मात्यांनी करारावर घेतली सही, अभिनेत्याने दिली माहिती

‘बावरा दिल’ या मालिकेत धैर्य सरकार या खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी त्याने सैफ अली खानकडून प्रेरणा घेतल्याचं त्याने म्हटलं आहे. “मला नेहमीच नकारात्मक पात्रांबद्दल आकर्षण वाटतं आलंय. याचे कारण खलनायकी भूमिकांमध्ये भावनांच्या अनेक छटा साकारायला मिळतात. आपल्यातल्या अभिनेत्याचा त्यामुळे कस लागतो, असं मला वाटतं. तान्हाजीमधील उदय भान ही भूमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ सर कशी साकारली होती. हे मला पाहायला मिळालं. त्यांची तयारी बारकाईने न्याहाळायची संधी मला मिळाली. त्याचा फायदा ‘सरकार’ ही भूमिका रंगवताना होत आहे,” असं धैर्य म्हणाला.