माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे सज्जन व्यक्ती होते, तरी त्यांचे सरकारवर कोणतेही नियंत्रण नसल्याने त्याकाळात देश रसातळाला गेला, अशी टीका माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या व्यवस्था मोडून काढल्या व नवीन चांगल्या व्यवस्था निर्माण केल्या. स्वामी विवेकानंदांकडूून प्रेरणा घेऊन संन्यासी योद्धा म्हणून ते काम करीत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

प्रदेश भाजपतर्फे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे औचित्य साधून आभासी फेरी (व्हर्च्युअल रॅली) आयोजित करण्यात आली होती. त्यास राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश,  प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.

पंतप्रनधान मोदी हे एक कणखर नेतृत्व आहे. केवळ बोलणारे नाही, तर काम करून दाखविणारे नेतृत्व आहे. भारताचा हा उज्वल काळ असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.