महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९व्या शतकापासूनच्या महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास लिहिण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प दोन खंडांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.पहिल्या खंडात १८०० ते १८५७ पर्यंतचा, तर दुसऱ्या खंडात १८५७ ते १९४७ पर्यंत व स्वातंत्र्योत्तर ते आजवरच्या कालखंडाचा समावेश असणार आहे.
या प्रकल्पासाठी मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी एका समितीची स्थापना केली
आहे. या समितीत अरुण साधू, नंदा खरे, सतीश काळसेकर, डॉ. गो. मा. पवार, डॉ. विलास खोले, डॉ. अरुणा ढेरे, अर्जुन डांगळे, दिनकर गांगल, राजा दीक्षित, डॉ. अशोक चौसाळकर, सुहास पळशीकर, अभय टिळक, डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा समावेश आहे.
 पहिल्या आणि दुसऱ्या खंडाचे संपादक म्हणून अनुक्रमे डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. नागनाथ कोतापल्ले हे काम पाहणार आहेत.
राजकीय स्थित्यंतर, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तन याचा आढावा घेण्यात येणार आहे.   १९व्या शतकातील १८५७पर्यंतच्या स्थित्यंतराचाही सविस्तर आढावा यात घेण्यात येणार आहे. या दोन खंडांमधून गेल्या २०० वर्षांमधील महाराष्ट्रात झालेल्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाचा इतिहास उलगडला जाणार आहे.

विविध विषयांचा आढावा
राजकीय स्थित्यंतर, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तन यांचा आढावा घेण्यात येणार आहे.  १९व्या शतकातील १८५७पर्यंतच्या स्थित्यंतराचाही सविस्तर आढावा यात घेण्यात येणार आहे.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात