वाहनांना योग्यता प्रमाणपत्रे देताना नियमांनुसार काटेकोर तपासणी करण्याचे कोर्टाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून प्रमाणपत्रे दिल्याने राज्यातील ३७ मोटार वाहन निरिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परिवहन आयुक्तांनी या संदर्भातील आदेश शुक्रवारी जारी केले.

राज्याच्या गृह (परिवहन) विभागाने परित्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, मुंबई हायकोर्टाने २०१३ मध्ये एका जनहित याचिकेवर निर्णय देताना वाहनांना योग्यता प्रमाणपत्रे देताना नियमानुसार काटेकोर तपासणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?

त्यानुसार, वाहनांची काटेकोर तपासणी न करता त्यांना योग्यता प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने ही बाब गंभीर असल्याने राज्यातील २८ मोटार वाहन निरिक्षक आणि ९ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अशा एकूण ३७ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम ३ चा भंग केल्याने त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, पनवेल आणि ठाणे येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे मुख्यालय ते सध्या कार्यरत असलेले ठिकाणच असेल. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय त्यांना आपले मुख्यालय सोडता येणार नाही, असेही परिपत्रकात सांगण्यात आले आहे.