मुंबई: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी आणखी ६३ विशेष रेल्वे फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

गाडी क्र मांक ०१२५३ आणि ०१२५४ लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी दोन फेऱ्या, गाडी क्र मांक ०१२५७ आणि क्र मांक ०१२५८ लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी १० फे ऱ्या, गाडी क्र मांक ०१२५९ आणि क्र मांक ०१२६० पनवेल ते सावंतवाडी १४ फे ऱ्या, गाडी क्र मांक ०१२६१ आणि ०१२६२ पनवेल ते चिपळूण २४ फे ऱ्या, गाडी क्र मांक ०१२६३ आणि ०१२६४ दादर ते रत्नागिरी आठ फे ऱ्या, गाडी क्र मांक ०१२६७ दादर ते मंगलुरु जक्शन, गाडी क्र मांक ०१२५५ आणि क्र मांक ०१२५६ नागपूर ते करमाळी चार फे ऱ्या होणार आहेत. ४ सप्टेंबरपासून या गाडया सुटतील. २९ ऑगस्टपासून या गाड्यांचे आरक्षण सुरु होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.