मुंबई : आयआयटी पवईमध्ये शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय दर्शन सोलंकीने जातीभेदावरून होत असलेल्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या केली. दर्शन सोलंकीच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी त्याचे वडील मुंबईत येण्यापूर्वीच त्यांच्या संमतीशिवाय दर्शनच्या मृतदेहाचे राजावाडी हॉस्पिटलमध्ये विच्छेदन करण्यात आले, असा आरोप माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. या संपूर्ण प्रकरणाची (एसआयटी) विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी १ मार्चपासून आझाद मैदान येते धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील आयआयटी पवईमध्ये १२ फेब्रुवारी रोजी दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने सातव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आयआयटीच्या अभ्यासक्रमाचा ताण घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे सांगून जातीभेदाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे आरोप आयआयटीच्या प्रशासनाने फेटाळून लावले. मात्र, पहिल्याच प्रयत्नात सामाईक प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेला दर्शन अभ्यासाला कंटाळून का आत्महत्या करेल, असा प्रश्न डॉ. मुणगेकर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ठाकरे गटाने…”

हेही वाचा – एचडीआयएलचे राकेश व सारंग वाधवान विरोधात गुन्हा, ८८ कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआयटी प्रशासनाने दर्शन आजारी असल्याची खोटी बातमी सांगून रमेशभाई सोलंकी यांना मुंबईत बोलावले. दर्शनच्या पालकांची परवानगी न घेताच त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. या सर्व गोष्टी संशयासपद आहेत, असे मुणगेकर म्हणाले. त्यामुळे अंतर्गत समितीकडून या प्रकरणाची चौकशी न करता (एसआयटी) विशेष चौकशी पथकाकडून करावी, अशी मागणी २५ संघटनांच्या वतीने डॉ. मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकाकडे सोपविण्याच्या मागणीसाठी १ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात दर्शन सोलंकीचे वडील रमेशभाई सोलंकीदेखील सहभागी होणार आहेत, असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.