मुंबई: केंद्र सरकारने ‘डीजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल-२०२२’ याचा मसुदा तयार केला असून देशातील जनतेची मते मागवली आहेत. नागरिकांच्या खासगी माहितीचे संरक्षण करण्याच्या नावाने हे विधेयक आणले आहे. मात्र प्रस्तावित विधेयकातील तरतुदींमुळे माहिती अधिकार कायद्यावर (आरटीआय) अनेक निर्बंध येणार आहेत. यामुळे माहिती अधिकार कायदा धोक्यात आला असल्याचे मत माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी चर्चासत्रात शनिवारी मांडले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहिती अधिकार कार्यकर्ते आणि माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदीवर या विधेयकामुळे अनेक बंधने येणार आहेत असे सांगितले. खासगी माहिती संरक्षण विधेयक-२०२२ या विधेयकातील तरतुदीमुळे आरटीआय कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे माहितीचा अधिकार हिरावला जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Activists express fear new data protection bill will damage rti act provision mumbai print news zws
First published on: 15-01-2023 at 02:42 IST