मुंबई:रेल्वे भरती परीक्षेच्या निकालावरून गेल्या आठवडय़ात उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा रद्द कराव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेश व बिहारमध्ये रेल्वे भरतीवरून हिंसक प्रतिक्रिया उमटली होती. या दोन्ही राज्यांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी रेल्वे मार्गावर ठाण मांडले होते. रेल्वे गाडी पेटवून देण्यात आली. बिहारमध्ये बंद पाळण्यात आला. भाजपशासीत उत्तर प्रदेश व बिहार (या राज्यात भाजप सत्तेत भागीदार आहे) या दोन राज्यांमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर बिगर भाजपशासीत महाराष्ट्रात दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा रद्द कराव्यात म्हणून विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कोणी एका वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्याच्या व्हिडिओवरून राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन झाले, या मागे संघटित शक्ती असावी, असा संशय व्यक्त केला जातो. एका व्यक्तीच्या आवाहनानुसार एवढे विद्यार्थी रस्त्यावर येणे अशक्य असल्याचे बोलले जाते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After uttar pradesh bihar maharashtra youth students protest against offline exam zws
First published on: 01-02-2022 at 03:37 IST