मुंबई : आपल्याला पाळीव श्वानाची हत्या करणाऱ्या काळजीवाहकाविरोधातील खटला गेली चार वर्षे प्रलंबितआहे. त्यामुळे, तो लवकरात लवकर निकाली काढून आपल्या श्वानाला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी बॉलिवूड अभिनेत्री आयेशा जुल्का यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चार वर्षांपासून खटला प्रलंबित असून त्याच्या सुनावणीला सुरूवातही झालेली नाही, असा दावाही आयेशा हिने केला आहे.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर आयेशा यांच्या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी, याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी तिच्यातर्फे करण्यात आली. मात्र, या मागणीमुळेच या प्रकरणी संबंधित एकलपीठाकडे दाद मागण्याची सूचना खंडपीठाने आयेशा यांना केली.

mother in law and son convicted for setting ablaze daughter in law
शिक्षा स्थगितीस न्यायालयाचा नकार; नववधूची हुंड्यासाठी हत्या; पतीसासूच्या जन्मठेपेच्या शिक्षेची केवळ नऊच वर्षे पूर्ण
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
thane education officer challenges suspension over badladpur sex assault in bombay hc
Badlapur Sexual Assault: निलंबनाच्या कारवाईविरोधात ठाण्याचे शिक्षणाधिकारी उच्च न्यायालयात
Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी
missing women, High Court, State Govt,
बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का ? उच्च न्यायालयाची राज्य सरकार, पोलिसांना विचारणा
Supreme Court warns state government regarding Ladaki Bahine Yojana print politics news
मोठी बातमी! कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
Kirit Somaiya probe ins vikrant
Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा किरीट सोमय्यांना धक्का; चौकशी आवश्यक असल्याचे दिले आदेश
Supreme Court Grants Bail To Manish Sisodia
सर्वोच्च न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर तरी ‘जामीन हा नियम आणि तुरुंगवास हा अपवाद’ हे प्रत्यक्षात येईल?

हेही वाचा…अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार

आयेशा यांच्या लोणावळा येथील बंगल्यात काम करणाऱ्या काळजीवाहकाने (केअरटेकर) १३ सप्टेंबर २०२० रोजी पाळीव श्वान रॉकीचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र, आयेशा यांच्या मनात संशय निर्माण झाल्याने त्यांनी रॉकीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी रॉकीचा मृत्यू बुडून नाहीतर गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले. या अहवालाच्या आधारावर आयेशा यांनी १७ सप्टेंबर २०२० रोजी काळजीवाहकाविरोधात श्वानाची हत्या केल्याची तक्रार दाखल केली.

या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने राम नाथू आंद्रे याच्यावर मद्यधुंद अवस्थेत श्वानाचा गळा दाबल्याचा गुन्हा दाखल केला व २५ सप्टेंबर रोजी त्याला अटक केली. आरोपीने चौकशीत गुन्हा कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र, दोन दिवसांनी आंद्रेला जामीन मंजूर करण्यात आला. पुढे, या प्रकरणी मावळ पोलिसांनी ७ जानेवारी २०२१ रोजी आरोपपत्र दाखल केले. झुल्का यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये दंडाधिकारी न्यायालयात धाव घेऊन हस्तक्षेप अर्ज दाखल केला व प्रकरणाची सुनावणी अद्याप प्रलंबित असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

हेही वाचा…डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून सेवा-सुविधा

दुसरीकडे, तपासादरम्यान रक्ताचे डाग असलेली चादर पुण्यातील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये (फॉरेन्सिक लॅब) पाठवण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवाल गोळा करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे आपल्याला तोंडी सांगण्यात आल्याचा दावाही आयेशा यांनी केला. तसेच, सरकारी वकिलांनी खटला चालवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी तक्रार आपण मुंबईतील अभियोक्ता संचालनालयाकडे केली. त्यानंतरही, काहीच कारवाई करण्यात न आल्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे आयेशा यांनी याचिकेत म्हटले आहे.