मुंबईच्या नालेसफाईवरून राजकारण रंगलेले असतानाच मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य़ व्हावा यासाठी दररोज या नाल्यांमध्ये मानेपर्यंत उतरून त्यातली हजारो मेट्रिक टन गाळ हातांनी उपसणाऱ्या कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यात मुंबईत पाणी साठू नये यासाठी गेले दीड महिना विविध भागात नालेसफाई सुरू आहे. नाल्यातून निघणाऱ्या गाळाच्या हजारो मेट्रीक टनांच्या आकडय़ांच्या जंजाळात प्रशासन आणि सामान्य नागरिकही गुंतले आहेत. मुंबईत सुमारे साडेतीन लाख मीटर लांबीचे लहान आणि मोठे नाले आहेत. या नाल्यातून दरवर्षी साधारण चार लाख घनमीटर टन गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जातो. मोठय़ा नाल्यातील गाळ काढण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत. तर तीन वेळा निविदांना प्रतिसाद आला नसल्याने लहान नाल्यातील म्हणजे गटारांमधील गाळ काढण्यासाठी वॉर्ड पातळीवर विविध संस्थांकडून काम करून घेण्यात येत आहे. नाल्यातील गाळ काढण्यासाठी पोर्कलेन यंत्राचा वापर करण्यात येत असला तरी नाल्यांच्या दोन्ही बाजूंची झालेली अतिक्रमणे तसेच मोठय़ा गटारात पोर्कलेन यंत्र उतरवू शकत नसल्याने बहुतांश ठिकाणी कामगार हा गाळ हाताने उपसत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleaning worker health question still not solved by government
First published on: 04-06-2016 at 02:10 IST