गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली. मात्र, निकालात भाजपाला दणदणीत विजय मिळताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर आता गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला.यावर एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आज आम्ही महाराष्ट्रात भरपूर काम करत आहोत. मुंबईचं सुशोभिकरण सुरू आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर करून कायापालट झाला पाहिजे. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे.”

Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
Ajit Pawar, Raj Thackeray,
राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
Baban Gholap
शिंदे गटात प्रवेश करून बबन घोलप यांनी काय साधले ?
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

“…म्हणून आम्ही सरकार बदललं”

“मुंबईत देशातील-विदेशातील पर्यटक येतात. त्यांना ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या दुर्दैवाने आजपर्यंत मिळाल्या नाहीत. म्हणून आम्ही सरकार बदललं. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारं सरकार आहे. मुंबईचाही कायापालट झाला पाहिजे. म्हणून आम्ही स्वच्छता आणि सुशोभिकरणाला प्राधान्य दिलं. लवकरच हे दृश्य स्वरुपात दिसेल आणि मुंबईकरांना लाभ होईल,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

“फडणवीस आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते”

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि गुजरातच्या नागरिकांचं अभिनंदन करतो. एक चांगला निकाल आला आहे. भाजपाला गुजरातमध्ये १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करत आणि सर्वांना शुभेच्छा देतो.”

हेही वाचा : “हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल आणि गुजरातमध्ये…”, संजय राऊत यांचं मोठं विधान

“मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे”

“मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे. आज आपल्याला जी-२० चं अध्यक्षपदही मिळालं आहे. हे आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे. जी-२० चं नेतृत्व मोदींनी करणं हीदेखील देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये १४ बैठका आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.