मुंबई : करोना निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून जनताजनार्दनासाठी बंद असलेले मंत्रालयाचे प्रवेशव्दार लवकरच उघडले जाणार आहे. विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या सामान्यांना पूर्वीप्रमाणेच दुपारी दोन नंतर मंत्रालयात प्रवेश देण्याबावतचा प्रस्ताव गृहविभागाने मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. त्यांची मान्यता मिळताच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. करोनाची साथ ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने गुढीवाडव्यापासून सर्व निर्बंध काढले आहेत. मात्र  सामान्यांसाठी मंत्रालय प्रवेशाचे निर्बंध मात्र अजून कायम आहेत. करोना काळातही मंत्री, सचिवांच्या शिफारशीने येणाऱ्यांना तसेच उद्योगक- व्यावसायिक आणि तसेच मध्यस्थांना मंत्रालयाचे दरवाजे खुले असले तरी  अन्य लोकांना तसेच शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनाही मंत्रालयत प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागते. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आले असून गेल्याच आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंत्रालयत येऊन कामकाज सुरू केले.

thane lok sabha cm eknath shinde marathi news, cm eknath shinde thane lok sabha marathi news
ठाण्यात भाजप, नाईकांना रोखण्यात मुख्यमंत्री यशस्वी
3454 crore drought fund to Karnataka from central Government
कर्नाटकला ३,४५४ कोटी दुष्काळनिधी; उर्वरित निधी लवकर देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती
major anuj sood marathi news, major anuj sood latest marathi news
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्याचे प्रकरण : मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही हे सरकारने प्रतिज्ञापत्रावर सांगावे, उच्च न्यायालयाचे ताशेरे
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!