१७ मेपर्यंत म्हणजेच लॉकडाउन असेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत मुंबईत संचारबंदी असणार आहे. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त वैद्यकीय सेवांना म्हणजेच क्लिनिक्स, हॉस्पिटल्स आणि मेडिकल्स यांना या वेळेतून मुभा देण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कुणीही बाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी या संदर्भातले एक पत्रकच जाहीर केले आहे. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे १७ मेपर्यंत मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र Epidemec diseases Act 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ यानुसार हे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई शहराचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसारच हा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे कारण मुंबईत करोना व्हायरसचे ७ हजारच्या वर रुग्ण आहेत. त्याचमुळे मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १७ मेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे असंही या पत्रात म्हटलं आहे.

सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत लॉकडाउनचे नियम पाळून आवश्यकता असल्यास बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. लॉकडाउनचा कालावधी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे १७ मे पर्यंत मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी असणार आहे. मुंबईकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावं आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच किमान सहा फुटांचं अंतर पाळूनच व्यवहार करावेत असंही या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curfew in mumbai till 17th may from 8 pm to 7am says police commissioner scj
First published on: 04-05-2020 at 16:27 IST