राज्यातील १२ कामगार विमा योजनेची रुग्णालये राज्य शासनाने चालवावित की चालवू नयेत, असा प्रश्न पुढे आला आहे. या संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
राज्यात एकूण १३ कामगार रुग्णालये आहेत. त्यापैकी अंधेरी येथील एक रुग्णालय तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित १२ रुग्णालये चालवायची म्हटले तर राज्य सरकारवर त्याचा मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. शिवाय गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने सुमारे १५०० कोटी रुपयांचे अनुदान दिलेले नाही. त्यामुळे या रुग्णालयांचे काय करायचे, याचा मंत्रिमंडळात निर्णय करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2014 रोजी प्रकाशित
कामगार रुग्णालयांबाबत लवकरच निर्णय
राज्यातील १२ कामगार विमा योजनेची रुग्णालये राज्य शासनाने चालवावित की चालवू नयेत, असा प्रश्न पुढे आला आहे.
First published on: 30-12-2014 at 02:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision soon on workers hospital