महात्मा गांधी यांची सत्य आणि अहिंसा ही दोन तत्त्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाळतात का? या तत्त्वांप्रमाणे तुम्ही वागत नाही तोपर्यंत तुम्हाला महात्म गांधीजींच्या नावाने राजकारण करण्याचा अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्लॉगला उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दांडी यात्रेच्या स्मरण दिनानिमित्त महात्मा गांधीजींवर ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगला उत्तर देताना नवाब मलिक यांनी महात्मा गांधीजींची सत्य आणि अहिंसा ही दोन तत्वे मोदी पाळतात का ? असा सवालही केला. महात्मा गांधी यांच्यावर ब्लॉग लिहिताना मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आमचा एकच प्रश्न मोदींना आहे की, महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करता परंतु त्यांच्या विचाराचे पालन किती करता आहात असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did pm modi follow the path of mahatma gandhi ask nawab malik on his blog
First published on: 12-03-2019 at 19:14 IST