मी मुख्यमंत्री होण्यासाठी बंड केलं नाही. लोकांनी दिलेल्या कौलाप्रमाणे सरकार स्थापन झालं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न केला. पण, यश आम्हाला आलं नाही. बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आम्ही मतं मागितली. लोकं आमच्यासारखं बोलतं नाहीत. मतपेटीतून दाखवतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’मध्ये बोलत होते.

“भाजपा सत्तेसाठी कोणतीही तोडफोड करत नाही. राज्याचा विकास होऊन चांगले दिवस आले पाहिजेत. ही भूमिका ठेवून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री पद मला देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका मोठी आहे. तसेच, सरकार बदलल्याने केंद्राने २ लाख कोटी रुपये दिले. अन्य प्रकल्पांनाही केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. आम्ही हेच सांगत होतो. अडीच वर्षे पुढं गेलो असतो, मागे नाही,” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

Amit Shah claims that there is no encroachment of even an inch by China
चीनकडून एका इंचावरही अतिक्रमण नाही; अमित शहा यांचा दावा; पहिले पंतप्रधान नेहरूंवर टीकास्त्र
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
aap jantar mantar hunger strike
महात्मा गांधी ते ममता बॅनर्जी; उपोषण हे ‘राजकीय शस्त्र’ म्हणून कसे वापरले गेले?
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?

हेही वाचा : “गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यपाल खासगीत…”, कोश्यारींच्या पदमुक्तीच्या इच्छेवर देवेंद्र फडणवसींची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील कोणत्या मिस करताय? असा सवाल एकनाथ शिंदेंना विचारला. यावर एकनाथ शिंदे अशोक चव्हाण यांच्याकडे पाहून म्हणाले, “सांगू का इथे. नाव घेतली तर त्यांची अडचण होईल ना. सांगायचं नसतं. गुपचूप कार्यक्रम करायचं असतो. तसेच, महाविकास आघाडीच्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये कसे निर्णय व्हायचे. याचे साक्षीदार अशोक चव्हाण आहेत,” असेही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.