बिल थकल्याचे कारण पुढे करून नोटीस न देताच पालिका अधिकाऱ्यांनी जोगेश्वरीतील एका चाळीचा पाणीपुरवठा खंडित केला असून त्यामुळे पाच कुटुंबांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. या विभागातील राजकारणी महिलेची वक्रदृष्टी झाल्याने आपल्यावर ही वेळ ओढवल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. जोगेश्वरी येथील वांद्रेकर वाडीतील जोशी चाळीमधील पाच कुटुंबीयांचा पाणीपुरवठा पालिकेने शुक्रवारी खंडित केला. तीन महिन्यांचे बिल भरलेले नसल्याचे कारण पुढे करूनपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या संदर्भात चाळीतील रहिवासी सुनील सरदेसाई म्हणाले की, पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. शुक्रवारी पालिका अधिकारी आले आणि त्यांनी तीन महिन्यांचे बिल थकल्याचे सांगून पाणीपुरवठा
खंडित केला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2014 रोजी प्रकाशित
बिल थकल्याचे सांगून पालिकेने पाणी तोडले
बिल थकल्याचे कारण पुढे करून नोटीस न देताच पालिका अधिकाऱ्यांनी जोगेश्वरीतील एका चाळीचा पाणीपुरवठा खंडित केला असून त्यामुळे पाच
First published on: 13-01-2014 at 12:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For not paying dues water supply cut off says bmc