बिल थकल्याचे कारण पुढे करून नोटीस न देताच पालिका अधिकाऱ्यांनी जोगेश्वरीतील एका चाळीचा पाणीपुरवठा खंडित केला असून त्यामुळे पाच कुटुंबांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. या विभागातील राजकारणी महिलेची वक्रदृष्टी झाल्याने आपल्यावर ही वेळ ओढवल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. जोगेश्वरी येथील वांद्रेकर वाडीतील जोशी चाळीमधील पाच कुटुंबीयांचा पाणीपुरवठा पालिकेने शुक्रवारी खंडित केला. तीन महिन्यांचे बिल भरलेले नसल्याचे कारण पुढे करूनपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या संदर्भात चाळीतील रहिवासी सुनील सरदेसाई म्हणाले की, पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. शुक्रवारी पालिका अधिकारी आले आणि त्यांनी तीन महिन्यांचे बिल थकल्याचे सांगून पाणीपुरवठा
खंडित केला.