ज्येष्ठ गझलकार व कवी मनोहर रणपीसे (६८) यांचे दीर्घ आजाराने मुंबईत बुधवारी निधन झाले.   त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून रणपीसे कर्करोगाने आजारी होते. ‘मृगजळाचे गाव माझे’, ‘शुभ्र कमळांचे तळे’, ‘सुफी’, ‘वाळुची घरे’, ‘प्रेषित’, ‘अद्वैत’, ‘बहरलेले झाड,‘अंतर्यामी’, ‘निर्वाण’, ‘कोरा कागद’ हे त्यांचे गझलसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘निसर्ग आणि मी’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. युआरएल फाऊंडेशनच्या ‘गझल गौरव’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. श्रोत्यांसमोर अत्यंत ताकदीने गझल पोहोचविणे हे रणपीसे यांच्या गझल सादरीकरणाचे वैशिष्ठय़ होते.