मुंबईच्या किनाऱ्यावरून जाणारा नवा मार्ग मरिन लाइन्सहून सुरू होत थेट विरार गाठणार आहे. भविष्यात तो थेट पालघर आणि वाढवण बंदरापर्यंत नेण्यात येणार आहे. याचा पहिला टप्पा आहे तो मरिन लाइन्स ते वरळी. तब्बल १४०० कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या १०.५८ किलोमीटर्सच्या या पहिल्या टप्प्याचा एक मोठा भाग चक्क मुंबईच्या पोटातून जातो. एरवी उपलब्ध मार्गाने हा टप्पा पार करायचा तर ४०मिनिटं ते एक तास किंवा त्याहूनही अधिक कालावधी लागतो. या नव्या मार्गाने मुंबईकरांचे श्रम आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.

‘मावळा’ नावाच्या चार मजली इमारती एवढ्या उंचीच्या टीबीएम मशिनने या बोगद्याचे खणकाम केले. हा मार्ग दुहेरी असल्याने इथे दोन बोगदे आहेत. प्रत्येक बोगद्यात प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मार्गिका आहेत. तर बोगद्याबाहेरचा मार्ग हा चार पदरी म्हणजेच एकूण आठ मार्गिकांचा आहे. या बोगद्यासाठी समुद्रामध्ये भराव घालण्यात आला. त्यावर निर्माण झालेल्या २०० एकर जमिनीवर एक आणि महालक्ष्मीच्या रेसकोर्सवरील सव्वाशे एकरांवर एक अशी दोन मोठी उद्याने उभी राहणार असून ती देखील एका बोगद्याने जोडली जाणार आहेत.

yavatmal evm machines marathi news
३६ दिवस जागते रहो…! शासकीय गोदामात ‘ईव्हीएम’ कडेकोट बंदोबस्तात राहणार
Redevelopment of building without help of private developers banks brokers
मुंबई : खासगी विकासक, बँक, दलालांची मदत न घेता इमारतीचा पुनर्विकास
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका

समजून घ्या, अत्याधुनिक मुंबईचा चकीत करणारा नवा प्रवास!