फेरीवाल्यांची समस्या सोडवायची असेल तर यंत्रणेपेक्षाही प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे; प्रशासन व राजकीय इच्छाशक्तीची. अधिकाधिक फेरीवाल्यांना मंडयांमध्ये जागा उपलब्ध करून देणे आणि त्याच वेळी रस्त्यावर, पुलावर एकही फेरीवाला दिसणार नाही हे पाहिले की रस्त्यावरील, पुलावरील गर्दी आपोआप मंडयांकडे वळेल. स्थानिक गुंडांना रोजचा हप्ता देण्यापेक्षा मंडयांमध्ये बसून व्यवसाय करणे फेरीवाल्यांसाठीही सोयीचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याकडे प्रत्येक समस्येची काही काळ लाट येते. मेमध्ये पाणीकपात, जुलैमध्ये खड्डे, सप्टेंबरमध्ये डेंग्यू, फेब्रुवारीमध्ये परीक्षा आणि जूनमध्ये प्रवेश.. दर वर्षी हे प्रश्न उभे राहतात. त्या-त्या वेळी भरपूर चर्चा होते, नाना उपाय सुचवले जातात. काही काळाने हा धुरळा खाली बसतो. सर्व मागे पडते आणि वर्षभरानंतर नव्याने त्याच प्रश्नावर चर्चा सुरू होते. मुंबईतील किंबहुना देशातील कोणत्याही नागरी भागातील अशीच एक कधीही न सुटलेली, किंबहुना कोणालाही सोडवावी अशी न वाटणारी समस्या म्हणजे रस्ते, पदपथ, पूल असे यत्रतत्रसर्वत्र अतिक्रमण करून बसलेले अनधिकृत विक्रेते. सध्या दोन दोन राजकीय पक्ष फेरीवाल्यांच्या विरोधात उतरल्याने आणि शहरातील विक्रेते फक्त परप्रांतीय असल्याचाही गैरसमज असल्याने पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा प्रश्न उग्र रूप धारण करणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hawkers menace in mumbai city
First published on: 10-10-2017 at 04:01 IST