मुंबईः घाटकोपर पश्चिम येथे किरकोळ वादातून दोघांवर बांबू व धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यात एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यात रतन डोळसे (४२) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मेहुणा सुनील पट्टेकर (३६) जखमी झाला आहे. घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून प्रकाश पोटे ऊर्फ गोट्या (४६), वैशाली मेहंदळे (४६) व करण कांबळे (१९) यांना अटक केली आहे. याशिवाय याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. सुनील पट्टेकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – Sameer Wankhede : नवाब मलिकांना दिलासा; समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी सादर केला क्लोजर रिपोर्ट

हेही वाचा – मुंबई : बीकेसी येथे वाहतुकीत बदल, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतुकीत बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीनुसार, सुनील पट्टेकर हा घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी येथील रहिवासी आहे. त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या प्रकाश पोटेविरोधात त्याचा वाद झाला. त्यातून पोटे व त्याच्यासोबत इतर व्यक्तींनी जमा होऊन सुनील यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. मृत रतन डोळसेही घरात उपस्थित होते. आरोपींनी दोघांवरही बांबू व धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात सुनील यांच्या डोक्यावरही गंभीर दुखापत झाली आहे. डोळसे यांच्याही डोक्यावर व हातावर गंभीर जखमा आहेत. त्यांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन आरोपींना राहत्या परिसरातून अटक करण्यात आली. तर उर्वरीत दोन आरोपींचा शोध सुरू आहे.