मुंबई : शुक्रवारी पहाटे धुक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल शुक्रवारी पहाटेपासूनच ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी, त्याचा फटका नोकरदार, व्यावसायिकांना बसला.मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ विभागात पहाटे दाट धुके पडल्याने दृश्यमानता कमी झाल्यामुळे मोटरमन आणि लोको पायलटला रेल्वेमार्ग दिसणे अवघड झाले होते. त्यामुळे मुंबईसह इतर सर्व विभागांतील रेल्वे कमी वेगाने धावत होत्या.

तर, मुंबई महानगरातील लोकल पहाटेपासून ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारी २ वाजतापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ होती. इतर विभागातून मुंबई उपनगरीय मार्गावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिल्याने अनेक लोकल बराच वेळ एकाच ठिकाणी उभ्या होत्या. तसेच अनेक लोकल उशिराने धावत होत्या.‘पहाटेच्या धुक्यामुळे १० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या’, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द