मुंबई: मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी  गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना महत्त्वाच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ११ नोव्हेंबर रोजीही दोघांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळीही राणा दाम्पत्य न्यायालयात अनुपस्थित राहिले.

हेही वाचा >>> राज्यपाल कोश्यारी यांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून न्यायालय रोखू शकते का?

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

वारंवार आदेश देऊनही अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने गुरुवारी त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले. न्यायालयाने राणा दाम्पत्याविरोधात बजावण्यात आलेले वॉरंट जामीनपात्र असून त्यामुळे राणा दाम्पत्य पुढील सुनावणीला न्यायालयात उपस्थित राहून पाच हजार रुपयांच्या जामिनावर वॉरंट रद्द करू शकतील.