मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा सोमवारी २४ तासांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र जल अभियंता खात्याने हाती घेतलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण होऊ न शकल्यामुळे २४ तासांनंतर उपनगरांतील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश आले आहे. उपनगरवासियांना मंगळवारी सकाळी १० वाजता पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र आता मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे  ३० जानेवारी  सकाळी १०:०० पासून  ३१ जानेवारी रोजी सकाळी १०:०० पर्यंत भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास पर्यायी ४००० मिमी व्यासाची जल वाहिनी जोडणे, २४०० व १२०० मिमी व्यासाच्या झडपा बसविणे, गळती दुरुस्ती करणे आणि इतर संलग्न कामे हाती घेण्यात आली होती. या सर्व कामांसाठी भांडुप संकुल येथील १,९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र सुमारे ४२ वर्षानंतर प्रथमच २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
dombivli traffic jam marathi news
माणकोली पुलावरील वाहन संख्या वाढल्याने डोंबिवलीतील रेतीबंदर रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
mumbai, mega block, central and western railway, maintenance work, local train, passengers, marathi news,
रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

हेही वाचा >>> चुनाभट्टीत सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

ही सर्व कामे पूर्ण करीत असताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे उपरोक्त कामे पूर्ण करून १,९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र, केंद्रापर्यंत येणाऱ्या व केंद्रापासून पुढे जाणाऱ्या सर्व जलवाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आठ तासांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे. या कामांमुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व, पश्चिम, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, वांद्रे पूर्व व पश्चिम या नऊ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे. तर पूर्व उपनगरातील भांडूप, घाटकोपर, कुर्ला येथील अनेक भागात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित आहे.

हेही वाचा >>> ‘म्हाडा’च्या हातोडय़ाआधी पाडकाम; अनिल परब यांचे वांद्रय़ातील अवैध बांधकाम

तर दादर, माहीम पश्चिम,  प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ यादरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी २०२३ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. बाधित झालेल्या भागांचा पाणीपुरवठा मंगळवार, ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता पूर्ववत करण्यात येणा होता. मात्र आता तो मंगळवारी संध्याकाळी ६:०० पासून पूर्वरत होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन  मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे.