मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीए) उर्वरित काम वेगात पूर्ण करत जुलैअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन आखले आहे. जुलैमध्ये हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यास मुंबई ते नागपूर असा थेट प्रवास समृद्धीने आठ तासात करता येणार आहे. सद्या:स्थितीत महामार्गातील भरवीर ते इगतपुरी अशा २५ टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून, आजपासून (३ मार्च) हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.

हेही वाचा >>> मुंबईत का जाणवतोय गारवा ? पुढील दोन दिवस …

Potholes on MTNL-LBS route elevated road in BKC 50 lakhs fine to the contractor
बीकेसीतील एमटीएनएल-एलबीएस मार्ग उन्नत रस्त्यावर खड्डे; उन्नत रस्ता वाहतुकीसाठी बंद, कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड
Kalyan Dombivli Municipal Administration, Kalyan, Dombivli, traffic free, Smart City Project, flyovers, pedestrian bridges, railway station, flyover, pedestrian bridge, bus depot, project completion, kalyan news,
कल्याण रेल्वे स्थानकाची लवकरच कोंडी मुक्ती, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्मार्ट सिटीची कामे प्रगतीपथावर
sion east west flyover closed for heavy vehicles
शीव उड्डाणपुलावरून अवजड आणि उंच वाहनांना बंदी; आज, उद्या माहीम परिसरात प्रवास करणे टाळावे, महानगरपालिकेचे आवाहन
msrdc 97 percent work marathi news
अखेरच्या टप्प्यातील ९७ टक्के काम पूर्ण, ‘समृद्धी’चा इगतपुरी आमणे टप्पा वाहतूक सुरू करण्यास प्राधान्य
nashik Mumbai journey marathi news
खड्डे, वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाला आठपेक्षा अधिक तास, महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सोमवारी मंत्रालयात बैठक
Traffic, Kalyan West railway station,
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील वाहन कोंडीने प्रवासी हैराण
Service Road Collapse on Mumbai Nashik Highway, Traffic Jam in Bhiwandi, Mumbai Nashik Highway Causes Major Traffic Jam, Mumbai Nashik Highway,
मुंबई नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्याचा भाग भूस्खलनामुळे खचला
Several infrastructure projects are nearing completion
पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर; मेट्रो रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ

राज्याच्या राजधानीला आणि उपराजधानीला जोडण्यासाठी ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गातील नागपूर ते भरवीर असा ६०० किमीचा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे, तसेच भरवीर ते इगतपुरी असा २५ किमीचा टप्पा सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

आतापर्यंत भरवीर ते आमणे या ७५ किमी टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. इगतपुरी ते आमणे टप्प्यातील एका मोठ्या पुलाचे काम आता शिल्लक आहे. हे काम पूर्ण करत जुलैमध्ये या टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यास हा टप्पा तात्काळ कार्यान्वित केला जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

समृद्धी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एमएसआरडीसीकडून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग समृध्दीपेक्षा १०० किमी लांब आहे. या महामार्गामुळे १२ जिल्हे जोडले जाणार आहेत. तसेच, नागपूर ते गोवा अंतर १० ते ११ तासात पूर्ण करता येणार आहे.