दहशतवाद विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहेत. या परिषदेस अनेक देशांचे प्रतिनिधी आलेले असून, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या परिषदेत सहभाग नोंदवला. यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “दहशतवाद संपवणे हेच आपलं उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांनीच सहभाग नोंदवला आहे. आज आपण पाहत आहोत की आपले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही हरियाणात अशाचप्रकारे आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व राज्यांचे गृहमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आपण सर्वजण मिळून दहशतवादाच्या विरोधात लढा देत आहोत.”

Arvind Kejriwal first reaction
अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य, “मला किती काळ तुरुंगात ठेवलं जाईल याचं उत्तर फक्त मोदी देऊ शकतात, कारण..”
lok sabha election 2024 cm eknath shinde criticizes uddhav thackeray over hindutva issues
बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
narendra modi
“नकली शिवसेनेत हिंमत असेल तर काँग्रेसच्या युवराजांकडून…”, कल्याणमधील सभेतून पंतप्रधान मोदींचं ठाकरे गटाला आव्हान
Sanjog Waghere, Parth Pawar,
…अन पार्थ पवारांचा पराभव आम्ही विसरू शकत नाहीत – संजोग वाघेरे
eknath shinde
नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांकडील नऊ मोठ्या बॅगांमध्ये काय होतं? विरोधकांच्या आरोपांवर शिंदे गटाचं उत्तर, म्हणाले…
What Narendra modi said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे?”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
himanta biswa sarma
“आम्ही तिथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकत नाही”, भाजपाचे मुख्यमंत्री असं का म्हणाले?
uddhav thackeray eknath shinde
“आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरे भाजपा नेतृत्वाला फोन करून म्हणाले…”, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

हेही वाचा : “आता आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी काय करायचं? आरती करा, हनुमान चालीसा करा…”; छगन भुजबळांचं विधान!

याचबरोबर “२६/११ चा हल्ला कोणीही विसरू शकणार नाही. तो दिवस आपल्या सर्वांसाठी काळा दिवस होता. तो कोणीच विसरू शकणार नाही. याच जागेवर आज एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आपण सर्वजण सोबत आहोत.” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

याशिवाय “ही जी सुरक्षा विषयक दहशतवादविरोधी परिषद होती. ती अतिशय महत्त्वाची होती. मी सर्वच संयुक्त राष्ट्राचे सदस्य व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की मुंबईत ताज हॉटेलमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं. यामध्ये केंद्रीय परराष्ट्रमंत्री जयशंकर हेही सहभागी झालेले होते. विविध देशांचे प्रतिनिधी होते आणि दहशतवाद विरोधातील लढाई आपण सामूहिकपणे लढतो आहोत व हे गरजेचंही आहे.” अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यामांना दिली.