लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई आणि उपनगरांत बुधवारी पावसाने विश्रांती घेतली होती. तर धरणक्षेत्रात अत्यंत तुरळक पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणी साठ्यात मात्र वाढ झाली आहे. सातही धरणांमध्ये सध्या १८.२९ टक्के पाणीसाठा आहे.

22 high tide days during monsoon
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
Nashik, Fraud with grape producers,
नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात दररोज मोठी वाढ होते आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून प्रत्येक धरणात साधारण ६ ते २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र जमिनीतून झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरणांतील जलसाठ्यात वाढ होत आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत आज धरणांमध्ये जास्त पाणीसाठा आहे.

आणखी वाचा-समन्वय समिती प्रवेशासाठी मुंबई, ठाणे, पालघरच्या गोविंदांचा ‘थर’

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. सातही धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. १ ऑक्टोबर रोजी धरणांमध्ये इतका पाणीसाठा उपलब्ध असल्यास मुंबईकरांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेला शक्य होते. अन्यथा फेब्रुवारी – मार्चदरम्यान मुंबईत पाणी कपात लागू करावी लागते. यंदा जूनच्या चौथ्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली. आठ दिवसांत पडलेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणक्षेत्रातही बुधवारी तुरळक पाऊस पडला. मात्र पाणीसाठा वाढत असून १८.२९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा

६ जुलै २०२३……२ लाख ६४ हजार ६५७ दशलक्ष लिटर…….१८.२९ टक्के

६ जुलै २०२२……२ लाख ३२ हजार ७४४ दशलक्ष लिटर……. १६.०८ टक्के

६ जुलै २०२१……२ लाख ७० हजार ९७० दशलक्ष लिटर…….१८.७२ टक्के