रामदास आठवले यांची भूमिका; ‘सनातन’च्या चौकशीची मागणी

भाजपसोबत युती असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हिंदू राष्ट्र संकल्पनेला आपला विरोध असल्याचे जाहीर केले. सनातन संस्थेवर सध्या गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या संस्थेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

Raj Thackeray post on Mahatma Gandhi
Raj Thackeray : “महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस..”, गांधी जयंतीच्या शुभेच्छा देताना काय म्हणाले राज ठाकरे?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil : तुम्ही भाजपा सोडणार का? हर्षवर्धन पाटलांचं सूचक भाष्य; म्हणाले, “लोकांचा आग्रह…”
What Supriya Sule Said?
Supriya Sule : “देवेंद्र फडणवीस यांचं हातात बंदूक घेतलेलं पोस्टर, ही मिर्झापूर सीरिज..” सुप्रिया सुळेंचा सवाल
bachchu kadu statement on ajit pawar
Bachchu Kadu : “राजकीय संकेत असं सांगतो की…”; अजित पवारांबाबत नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
Asmita Patil suicide case investigation is necessary Jayant Patil request to Police Commissioner
अस्मिता पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी गरजेची, जयंत पाटील यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
ajit pawar secular solapur speech
“भाजपसोबत सत्तेत असलो तरी आम्ही धर्मनिरपेक्षच”, अजित पवार यांचा दावा
Anil Deshmukh On Akshay Shinde Encounter
Anil Deshmukh : “हातात बेड्या असलेला आरोपी पोलिसांचे पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो?”, अनिल देशमुखांचा सवाल

संविधानातील धर्मनिरपेक्ष या शब्दामुळेच भारताची एकात्मता मजबूत आहे. हा शब्द वगळला तर संविधान आणि राष्ट्राची एकता खिळखिळी होईल. त्यामुळे कोणीही मागणी केली तरी हा शब्द संविधानातून काढता येणार नाही. तसा प्रयत्न झाला तर रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल, असा इशारा त्यांनी दिला.

हिंदू राष्ट्र संकल्पनेला आपल्या पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. सनातन संस्थेवर झालेले आरोप गंभीर असल्याने या संस्थेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. कोणताही विचार हत्या करून संपणार नाही. हिंसक कारवायांचे कोणी समर्थन करू नये. बंदी आणून फारसा फरक पडणार नाही. मात्र हिंसक कारवायांमध्ये असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र आले तर पंतप्रधान कोण होणार या मुद्यावरून त्यांचे ऐक्य फुटेल, मात्र देशात भाजप आघाडी जिंकेल आणि नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली पुन्हा सरकार अस्तित्वात येईल, असे भाकीत त्यांनी वर्तविले.