संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांचं लक्ष आज (१९ नोव्हेंबर) क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही मजबूत संघ मैदानात भिडणार आहेत. या पार्श्वभूमीवर या सामन्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी खेळाचा राजकीय इव्हेंट करण्याचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपावर सडकून टीका केली.

संजय राऊत म्हणाले, “आज क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना आहे. मी कधी क्रिकेट सामने पाहत नाही, पण भाजपाचे लोक संध्याकाळी सांगतील की, मोदी होते म्हणून जिंकलो. मोदी होते म्हणून अशी गोलंदाजी झाली, मोदी होते म्हणून असे चेंडू वळले, गुगली पडली. मोदींनीच मंत्र दिला. अमित शाह स्टंपच्या मागे उभे राहून मार्गदर्शन करत होते. हे लोक खेळाचाही राजकीय इव्हेंट करण्यापासून सोडत नाहीत.”

Team India T20 Captain Suryakumar Yadav
Suryakumar Yadav : ‘माझ्यासाठी गोष्टी सोप्या ठेवणे महत्त्वाचे…’, टी-२० संघाचा कर्णधार बनताच सूर्याचा जुना VIDEO व्हायरल
Indian Cricket Team Schedule of Sri Lanka Tour
IND vs SL मालिकेचं वेळापत्रक जाहीर, प्रशिक्षक म्हणून गंभीर पर्वाला होणार सुरूवात; राहुल-हार्दिककडे कर्णधारपद?
Sanath Jayasuriya, sri lanka head coach
श्रीलंकेच्या संघाला सावरणार ‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू, भारताविरूद्धच्या मालिकेपासून स्वीकारणार हेड कोचचा पदभार
Rahul Dravid said Rohit Sharma stopped him from resigning after the ODI World Cup sport news
एकदिवसीय विश्वचषकानंतर रोहितने पद सोडण्यापासून रोखले – द्रविड
best moment of my career says rohit sharma after winning t20 world cup
माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण! ट्वेन्टी२० विश्वविजयानंतर कर्णधार रोहितची भावना
Virat Kohli Only Player to Win 4 ICC Trophies
Virat Kohli: किंग कोहली! जागतिक क्रिकेटच्या इतिहासात ४ आयसीसी ट्रॉफी पटकावणारा एकमेव खेळाडू
India Women Cricket Team Scored Highest Ever Team Total In Womens Test
INDW vs SAW: भारताच्या लेकींचा विश्वविक्रम, ९० वर्षांच्या महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ
Rahul Dravid Makes Bold Prediction About Virat Kohli
IND vs SA T20 WC Finals: विराट कोहलीच्या भूमिकेबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, “काही मोठे बदल..”

“मुंबईतून संपूर्ण क्रिकेट अहमदाबादला हलवलं”

“मुंबई क्रिकेटची पंढरी होती. मात्र, मुंबईतून संपूर्ण क्रिकेट अहमदाबादला हलवण्यात आलं. सध्या मॅच फिक्सिंग आहे म्हणून, नाहीतर त्यांचा आत्ताच धुव्वा उडाला आहे. बेटिंग आणि मॅच फिक्सिंगनेच देश चालू आहे,” असे आरोप करत संजय राऊतांनी भाजपावर सडकून टीका केली.

व्हिडीओ पाहा :

https://x.com/ANI/status/1726106712254640361

“प्रत्येक गोष्टीत राजकीय इव्हेंट केला जात आहे”

संजय राऊत पुढे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा राजकीय इव्हेंट केला जात आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून कुणाचा मृत्यू असो अथवा खेळ, प्रत्येक गोष्टीत राजकीय इव्हेंट होत आहे. इथं मरणाचाही इव्हेंट केला जातो. खोटे अश्रु काढले जातात. आता हा तर क्रिकेट विश्वचषक आहे. इथं राजकारण कशासाठी, मात्र अहमदाबादमध्ये त्या खेळाचाही राजकीय इव्हेंट सुरू आहे.”

हेही वाचा : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर कोट्यवधींची सट्टेबाजी; पोलिसांची सट्टेबाजांवर करडी नजर

“मोदी ‘बॉलिंग’ करतील, शाह ‘बॅटिंग’ करतील आणि…”

“असं चित्र उभं केलं जात आहे की, जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बॉलिंग’ करतील, अमित शाह ‘बॅटिंग’ करतील, भाजपाचे लोक मैदानाच्या सीमेवर उभे राहतील. त्यानंतर म्हणतील आम्ही सांगितलं होतं की, अशी गोलंदाजी करा, हा फटका मारा. मोदी होते म्हणूनच आपला संघ जिंकला असंही म्हटलं जाईल. या देशात आजकाल काहीही होतं,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.