मुख्यमंत्री लवकरच कमबॅक करतील असं राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. विरोधक रोजच राज्यपालांकडे जातात, त्यात काही नवल नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. विरोधकांनी राजकारणाचा खालचा स्तर गाठला असल्याचंही यावेळी ते एबीपी माझासोबत बोलताना म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या हस्ते त्यांच्या वरळी मतदरासंघात अनेक विकासकामांचं उद्धाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी निवडणुकीत झालेल्या कामांवर रेटिंग झालं तर शिवसेना एक नंबर पक्ष ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जांबोरी मैदान चांगलं करा अशी मागणी येथील मुलांनी केली होती. त्यानुसार येथे कायापालट केला आहे. याशिवाय गार्डनची, फुटपाथची, सुशोभीकरणाची कामं आम्ही करत आहोत,” अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. पुढे ते म्हणाले की, “निवडणुकीत झालेल्या कामांवर रेटिंग झालं तर शिवसेना एक नंबर ठरेल. पण आम्ही निवडणुक असताना, नसताना काम करत असतो. अनेक शिवसैनिक तर तिकीटाची इच्छा न बाळगता काम करत असतात. जर असे कार्यकर्ते, पक्ष असेल तर जनतेची सेवा २४ तास होतच असते”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena aditya thackeray on maharashtra cm uddhav thackeray bmc election sgy
First published on: 23-01-2022 at 17:55 IST