मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याआधी केलेले सर्व दावे फोल ठरवत पहिल्याच मुसळधार पावसात मुंबापुरीची तुंबापुरी झाली. सालाबादप्रमाणे यंदाही अवघ्या काही तासांमध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साठल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. विरोधकांनी अगदी विधान परिषदेमध्ये मुंबईच्या पवासाचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि त्यांचा मित्रपक्ष तसेच मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ट्विटवरही मुंबई कोणामुळे तुंबली यावरुन भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ट्विटर युद्ध सुरु आहे. मात्र या सर्व गोंधळामध्ये शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचा शायराना अंदाज ट्विटरवर पहायला मिळत आहे. सत्ताधारी शिवसेनेने केलेले मान्सून पूर्व तयारीचे सर्व दावे फोल ठरत असल्याची टिका विरोधक करत आहेत. मात्र संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर देण्याऐवजी ट्विटवरुन या पावसासंदर्भात एक शायरी पोस्ट केली आहे. 'कुछ तो चाहत रही होगी इन बारिश की बूँदों की भी, वर्ना कौन गिरता है इस जमीन पर आसमान तक पहुँचने के बाद!' या ओळी राऊत यांनी ट्विट केल्या आहेत. सोमवारपासून सतत पडत असणाऱ्या आणि आज सकाळ जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच दुपारी एक वाजताच्या सुमारास राऊत यांनी ही शायरी पोस्ट केली आहे. कुछ तो चाहत रही होगी इन बारिश की बूँदों की भी, वर्ना कौन गिरता है इस जमीन पर आसमान तक पहुँचने के बाद ! — Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2019 एकीकडे मुंबईकरांचे हाल होत असताना राऊतांनी हे ट्विट केल्याने नेटकरी चांगलेच संतापले असून अनेकांनी त्यांना ट्विटवर दिलेल्या उत्तरामध्ये राऊत यांच्यावर टिका केली आहे. १) कुछ तो मजबुरी रही होगी इन मुंबई में राहनेवलों की भी, वर्ना कौन चुन के देता है आपको दरवर्षी इतका तुंबने के बाद ! — faijal khan (@faijalkhantroll) July 2, 2019 २) जो आसमान मे पहुचता है वो नीचे आता ही है, चाहे बारीश की बुंद हो या सत्ताधारी! — Mangesh B. Mhatre (@i_mangeshmhatre) July 2, 2019 ३) बरोबर बोलले "मातोश्रीमध्ये" तळे तयार करण्याची पावसाची ईच्छा होती राऊत साहेब नसता १००% नालेसफाईनंतरही हे कस शक्य आहे नाही का?pic.twitter.com/FLo4fy1sS7 — प्रकाश गाडे पाटील (@Prakashgadepat1) July 2, 2019 ४) तुंबती है मुंबई हर बार पाऊस मे.. क्या चाहत रही होगी? टक्केवारी की हाऊस ..आन बाकी कायच काय — Rofl Gandhi (मराठी) (@RoflGandhi_M) July 2, 2019 ५) जेव्हा रोम जळत होते, निरो पावा वाजवत होता. जनाची नाही, मनाची तरी शिल्लक असेल तर मुंबईचे आजचे हाल बघून जबाबदारीने वागा. — Pratapsinh Patil (@gpekmaratha) July 2, 2019 ६) स्वतच्या घरात पाणी नाही आले म्हणुन हे सुचत आहे ज्या दिवशी येईल त्या दिवशी कळेल.#लाचार — abhijeet (@AbhiAbhi768) July 2, 2019 ७) बेशर्मी की हद है। पहले मोदी के आगे घुटने टेके, अब मुम्बईकरों की मुसीबतों पर कविता फूट रही है, कहाँ गया मराठा गौरव जिसके लिये बाला साहेब ज़िंदगी भर लड़ते रहे? — #RSB (@rsb_bharat) July 2, 2019 ८) Shameless comment@republic @Zeenews @aajtak @indiatvnews @Dev_Fadnavis @AmitShah @narendramodi — Nilay Mehta (@nilay2cool) July 2, 2019 ९) BMC चे काय ते बघा अगोदर, राउत जी आपणास पाऊसात कविता सुचु लागल्या आहेत आणि आम्ही घरी आहोत कारण मुंबई चे रूपांतर सरोवरात झाले आहे. धन्य झालो रे पांडुरंगा — RAJ (@Rajshine9) July 2, 2019 १०) लोकांच्या दुःखावर मिठ चोळू नका. महापालिका अशी परिस्थिती हाताळण्यास असमर्थ आहे. कवितेतून असमर्थता व्यक्त करण्याऐवजी आयुक्त तसेच जबाबदार अधिकारी ह्यांच्यावर कारवाई करा. ते महापौर देखील बदला.#MumbaiRainlive — घाशीराम कोतवाल (@GhashiramK) July 2, 2019 दरम्यान सतत पडणाऱ्या पावसामुळे मालाड भागात भिंत खचल्याने १९ मजुरांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त मजूर जखमी झाले. या मृत्यूंना महापालिका जबाबदार असल्याचे विरोधाकांनी केलेले आरोपही राऊत यांनी खोडून काढले आहेत. १९ मजुरांच्या मृत्यूला मुंबई महापालिका नाही तर पाऊस जबाबदार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मालाडमध्ये जी घटना घडली तो एक अपघात आहे. पाऊसच इतक्या प्रमाणात झाला की हा अपघात घडला. मुंबईत अनेक बेकायदा बांधकामं सुरू आहेत मात्र मुंबई महापालिकेचा त्याच्याशी संबंध नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.