आठवडय़ाची मुलाखत : मिलिंद चिंदरकर (स्ट्रक्चरल इंजिनीअर)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतर्गत सजावट करताना काढले गेलेले पिलर (खांब) हे घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत दुर्घटनेमागचे कारण असावे, असा संशय व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी शीवमधील नवरे इमारत, बोरिवलीतील लक्ष्मी छाया या इमारतीदेखील खांब काढून टाकल्याने पडल्या होत्या. या दुर्घटनांमधून पालिकेच्या झापडबंद कारभाराबरोबरच आणखी एक मुद्दा ऐरणीवर येतो आहे तो म्हणजे इमारतीच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ अर्थात संरचना परीक्षणाचा. कोणतीही इमारत अचेतन वस्तू नसून ती जिवंत व्यक्तींना छत्रछाया देणारी वास्तू आहे. म्हणूनच तिचे आयुष्य वाढविण्यासाठी वेळोवेळी तिची तपासणी, दुरुस्ती, रंगसफेदी करणे आवश्यक असते; परंतु ‘वास्तुपुरुष’ म्हणून जे कुणी मालक, गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी असतात ते ही बाब दुर्लक्षित करतात. दुसरीकडे अंतर्गत सजावट करताना इंटेरिअर डिझायनर चुकीचा सल्ला देतात की, ज्यामुळे इमारतीच्या संरचनेला धोका पोहोचू शकतो. इमारतीला दीर्घायुषी करण्याच्या व्यवसायात असलेले स्ट्रक्चरल इंजिनीअर मिलिंद चिंदरकर यांनी नेमक्या याच धोक्यांची जाणीव करून दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Structural engineer milind chindarkar interview for loksatta
First published on: 01-08-2017 at 00:44 IST