विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेही लाट आली असून नागपूरमध्ये रविवारी तब्बल ४५.३ अंश से. तापमान नोंदले गेले. नागपूरसह अकोला व वर्धा येथेही तापमान ४५ अंश से. वर राहिले. उष्णतेच्या या लाटेचा प्रभाव सोमवारीही राहील. मराठवाडय़ात कमाल तापमान ४१ ते ४३ अंश से. दरम्यान होते. मुंबईत ३३.६ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली.
एप्रिलपासून दर आठवडय़ात राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटा येत आहेत. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील तापमान ४५ अंश से.च्या घरात गेले. सर्वच जिल्ह्य़ांमध्ये तापमान ४३ अंश से. च्या वर राहिले. नागपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्धा व अकोला येथे ४५ अंश, चंद्रपूर व ब्रह्मपुरीमध्ये ४४ अंश से. तापमान होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2016 रोजी प्रकाशित
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट
विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेही लाट आली असून नागपूरमध्ये रविवारी तब्बल ४५.३ अंश से. तापमान नोंदले गेले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-05-2016 at 02:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha temperature increase