मुंबई : कांदिवली (पूर्वे) परिसरातील ठाकूर संकुलद्वार येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत ९०० मिलीमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे व ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
हे काम येत्या २ जून रोजी दुपारी १.३० पासून ३ जून रोजी सकाळी ७.३० पर्यंत करण्यात येणार आहे. या कालावdateधीत संपूर्ण जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. परिणामी, आर – दक्षिण विभागातील काही परिसरांतील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार
आर दक्षिण विभाग – ठाकूर गाव, समता नगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व)
(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५) या भागात २ जून रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील