नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी करून महाराष्ट्राच्या सत्तेत स्थान मिळवले. राज्याच्या विकासासाठी काका शरद पवार यांची साथ सोडल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. आता त्यांचा पक्षाचे नागालँडचे सर्व सातही आमदारांनी राज्यातील सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नागालँडमधील सर्व सात आमदारांनी शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीची वाट धरली. त्यामुळे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ६० सदस्यीय विधानसभामध्ये पूर्ण बहुमत मिळाले. या विलीनतेमुळे पार्टी राष्ट्रीय लोकशाही प्रगती पक्षाचा (एनडीपीपी) आकडा २५ वरून ३२ वर गेला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतर नागालँड एनसीपीच्या युनिटने अजित पवार यांच्या गटासोबत राहणे पसंत केले होते. २०२३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एनसीपी तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. तर सहयोगी भाजपला १२ जागा मिळाल्या होत्या. या सात आदारांमध्ये टेनींगचे नाम्री न्हांग, अटोइझूचे पिक्टो शोहे, वोक्हा टाउनचे वाय, म्होनबेमो हुम्तसोई, मोन टाउनचे वाय, मांकाओ कोन्याक, लोंगलेगच्या ए, पोंगशी फोम, नोकलकच्या पी, लोंगोन आणि सुरुहोटोच्या एस, तोइहो येप्थो यांचा समावेश आहे.

 महाराष्ट्रात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सामील झाले होते. त्यांना त्यावेळी उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. त्यामुळे राज्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) असे दोन गट निर्माण झाले आहेत. राज्याच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. त्यानंतर महायुतीमध्ये राहून निवडणूक लढवली होती. त्यांना २०२४ विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले आणि त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील  सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता नागालँडमधील त्यांचा पक्ष फुटला आहे. सर्व सातही आमदार सत्ताधारी पक्षात विलिन झाले आहेत. त्यांना देखील त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करावयची आहे, असे त्यांच्या आमदारांची म्हणणे आहे. अशाप्रकारे अजित पवार यांच्यावर नियतीने सुड उगवला आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या माध्यमातून जे पेरले ते नागालँडच्या माध्यमातून उगवले, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या सर्व सात आदारांना अपात्र ठरवण्यात यावे, यासाठी नागालँड विधानसभा अध्यक्षाकडे अर्ज करण्याबाबत विचार करीत आहे. पक्ष सत्ताधारी एनडीपीपी सोबत गेलेल्या सात आमदारांना नोटिसा देण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे.