जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बल्लारपूर ते हैदराबाद रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

रेल्वेच्या धडकेत वाघाच्या शरीराचे दोन तुकडे झाले. बुधवारी सकाळच्या सुमारास गँगमन रेल्वेरुळाची तपासणी करीत असताना ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर, वनरक्षक संजय जाधव वनमजुरांसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली.