नागपूर : राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. पण सरकारकडून दखल घेतली जात नाही. आंदोलनात लाठीमार झाल्यावर कुणीतरी अधिकारी निलंबित केला जातो, पण लाठीमाराचा आदेश देणाऱ्या जनरल डायरचे काय, असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ते शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ४० आमदारांचे सदस्यत्व रद्द होणे आवश्यक आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांची भूमिका संविधानाप्रमाणे न्याय देणारी असली पाहिजे.
यानंतर ते मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपूरमार्गे रवाना झाले.

यावेळी सावनेर येथे आयोजित कार्यक्रमात ठाकरे म्हणाले, इंडिया, भारत, हिंदुस्थान ही नावे वेगवेगळी असली तरी आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत. या देशाची लोकशाही टीकवायची आहे. पण आज देशात लोकशाही उरलेली नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात दीड वर्षांपासून घटनाबाहा सरकार आहे. देशाचे संविधान प्रत्येकाला न्याय व अधिकार देणारे आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे. मात्र ते आपल्याला बदलू द्यायचे नाही. देशात परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. होर्डिंग, बॅनर व प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. पण दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचलेली नाही. वारकरी, महिला, मराठा समाजावर लाठीमार होत आहे. गणपतीच्या मिरवणुकीत एका आमदाराने गोळीबार केला पण कारवाई झाली नाही. असा सरकारचा कारभार सुरू असल्याची टीकाही ठाकरेंनी केली. याप्रसंगी आमदार सुनील केदार उपस्थित होते.

varsha gaikwad s manifesto released
वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्रात आश्वासनांचा महापूर
आरटीई कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती, एक किमी परिघातील खासगी शाळांना सूट देण्यावर बोट
state government order on deep fake video
सावधान! निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ व्हिडीओ शेअर कराल, तर होईल कारवाई; राज्य सरकारचे निर्देश
cbi not under control of union of India centre tells supreme court zws
सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही ; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा
iranian rapper toomaj salehi news in marathi
विश्लेषण: इराणी रॅपर तुमाज सालेहीला फाशीची शिक्षा का झाली? त्याचा नेमका गुन्हा काय?
Samajwadi Party decision to win the Maha Vikas Aghadi to break Modi dictatorship
मोदींची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करणार; समाजवादी पक्षाचा निर्णय
austrelian
भारतातील निवडणुकीचं वार्तांकन करण्याची परवानगी ऑस्ट्रेलियन पत्रकाराला नाकारली? सरकारने स्पष्ट केली भूमिका
mira bhaindar riot case marathi news, mira bhaindar violence marathi news
मिरा-भाईंदर येथील दंगलीनंतरचे प्रक्षोभक भाषणाचे प्रकरण : आमदार नितेश राणे आणि गीता जैनविरोधात गुन्हा