कच्चा आंबा कैरी , लोणचे किंवा पन्हे करण्यासाठी उपयोगात येतो. मात्र इथे असा आंबा आहे जो कच्चाच खाल्ला तर आनंद देतो. उद्योजक प्रदीप बजाज यांच्या घरी या आंब्याचे झाड आहे. विलुप्त होणाऱ्या जातीतील हे वाण असल्याचा दावा ते करतात. हा आंबा देशात कुठे असेल तर मला दाखवा,असे त्यांचे आव्हान आहे.

एक ते सव्वा किलोचा एकच आंबा तृप्त करतो,हे अनुभवास आले. पूर्ण फळला की तो सुरीने कापून खायचा. रसाळ नाही, पण चवदार. त्यांच्या वडिलांनी घरी रोपटे लावले होते.कौटुंबिक मित्र असलेले कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धोटे यांनी स्वतः त्यावर कलम बांधली. बहरल्यावर आंबे लागले ते खाताच सर्व चक्क.कच्चा आंबा कसा मधूर असू शकतो, हे चकित करणारे ठरले.

हेही वाचा >>>गडचिरोली: भामरागड प्रकल्पातील गैरव्यवहाराची ‘एसआयटी’ मार्फत चौकशीची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी चारशे ते पाचशे आंबे निघतात.अर्धे अधिक वाटल्या जातात.देशभर काम करणारे सनदी अधिकारी वर्धा जिल्ह्यात आल्यावर या आंब्याची मागणी करतात, ही अशी महती.बजाज म्हणतात की संबंधित संस्थांकडे या आंब्याची माहिती पाठवून एकमेव म्हणून दर्जा मिळावा असा प्रयत्न करीत आहे.